पुणे : मुळशी तालुक्यतील ताम्हिणी घाट परिसातून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुणे दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात असणाऱ्या मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत खाजगी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे.
या अघापघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. अशी ,माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे.ताम्हाणी घाटाजवळ एका धोकादायक वळणावर बस दरीत कोसळून पाच ठार तर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चाकण येथून महाडला लग्नासाठी जात असताना हा शुक्रवारी सकाळच्या सुमारास अपघात घडला. बसमध्ये ४० च्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहितीसमोर येत आहे.
संगिता धनंजय जाधव ,गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार ,वंदना जाधव, अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत. काहींची ओळख पेटवण्याचे काम सूरु आहे. अशी माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे
Leave a Reply