जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं सामूहिक आमरण उपोषण स्थगित केल. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, भाजपा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते फळांचा रस पिऊन जरांगे यांनी आपलं सातवं आमरण उपोषण स्थगित केल आहे.
तसेच जरांगेंच्यासोबत सामूहिक आमरण उपोषणात सहभागी झालेल्या मराठा उपोषणकर्त्यांना जरांगे यांनी स्वतःच्या हाताने पाणी पाजत त्यांना देखील उपोषण सोडण्याची विनंती करत पाणी पाजले. देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी गद्दारी करणार नाही असं म्हणत फडणवीस मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करतील असा विश्वास मनोज जरांगेंनी यावेळी व्यक्त केला आहे. जर फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर राज्याच्या मराठा समाजाची बैठक घेऊन मुंबई येथे जाण्याची तारीख जाहीर करू असा इशारा देखील जरांगे यांनी यावेळी दिला आहे
Leave a Reply