पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. बारामतीतील विकासकामांची पाहणी अजित पवार यांनी केली. यावली मार्गदर्शन करताना त्यांनी चक्क निवेदनाचा किस्सा सांगितला. एकाने मला निवेदन दिले , पंचायत समितीकडून शेतकऱ्यांना मोफत विहीर देण्याची योजना आहे.मात्र या कामात आमची एक भावकीच पैसे मागत असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे.एका विहिरीमागे 75 हजार रुपयांची मागणी होत आहे. याची मी शहनिशा करणार असून यात जर का पैसे घेतेले असतील तर त्याच काही खर नाही , अशी तंबीच अजित पवारांनी भर सभेत दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना अजीत पवार म्हणाले की, बारामतीची समिती हि एक आदर्श वास्तू आहे. या ठिकाणी शासन प्रशासनाकडून काम हे तसंच व्हावे अशी अपेक्षा आहे. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, नुसता दिखावा करून उपयोग नाही. खुर्चीवर बसलेल्या माणसाने हातात घेतलेला कागदातील माणूस ओळखला पाहिजे. नुसता कागद वाचून चालत नाही. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांची कामे वेळेत व तत्परतेने करण्याचा सल्ला दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अजित पवारांनी सांगितले कि, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिकेमध्ये सदस्य होण्याची संधी कोणत्या ना कोणत्या कारणावरून पुढे गेली ओबीसी आरक्षणा संदर्भातील महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने द्यायचा आहे. आता जे आरक्षण आहे ते ओपन, मागासवर्गीय आणि आदिवासी यांच्याकरिता आहे. ओबीसीसाठी नाही. ओबीसी हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. त्यांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. तो त्यांचा हक्क आहे. संविधानाने दिलेला तो हक्क आहे. मात्र याबाबतचा निर्णय लांबत आहे. आम्हाला अपेक्षा होती की, निकाल लागेल. आणि निवडणुका होतील. आम्ही सतत प्रयत्नशील आहोत असे अजित पवार यांनी बोलताना सांगितले.
Leave a Reply