Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

नामदेव महाराज शास्त्रीच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेनी बोलणे टाळले

जालना : भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्याबाबत आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. नामदेव महाराज यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. जालना दौऱ्यावर असताना आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी ऐकलं नाही, ते जर काही म्हणाले असतील तर ती त्यांची भूमिका आहे. देशमुख कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी भगवान गडाने उचलली असल्याचं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटल होतं. नामदेव महाराज शास्त्री जर काही बोलले असतील तर ती त्यांची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त झाल्याने फक्त बातमी होते असं मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढतोय या विषयावर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया देत दबाव कुठे आहे मला कळत नसल्याचं म्हणाल्या आहेत. नामदेव महाराज शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी भगवान गडाचे दरवाजे बंद केले होते असं प्रकाश महाजन म्हणाले होते. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, ते त्यांचं व्यक्त होत राहतात, त्यांच्या व्यक्त होण्यावर मी व्यक्त होत नाही असं स्पष्टीकरण मुंडे यांनीच दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »