मुंबई : ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकर यांनि एका मुलाखतीत हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे राहुल सोलापूरकर सध्या ट्रोल होऊ लागले आहेत. मात्र या वक्तव्यानंतर राहुल सोलपूरकर यांनी माफीनामा जाहीर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अभिनेता हेमंत ढोमे, अमोल कोल्हे , इतिहासकार, शिवाजी महाराजां वर अभ्यास करणारे अभ्यासक, राजकीय संघटना यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी आपला माफीनामा जाहीर केला आहे.
काय आहे माफीनाम्यात….
“इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात याबद्दल मी वक्तव्य केलं होत . शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका कशी झाली याबद्दल मी बोललो होतो. तसा संदर्भ काही इतिहासकारांनी लिहून ठेवला आहे. पण माझ्या या पूर्ण मुलाखती मधील ती दोन वाक्य वापरून काही लोकांनी वाद निर्माण केला. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा विचार माझ्या मनातही येणार नाही. त्या मुलाखतीमध्ये बोलताना मी लाच हा शब्द वापरला. त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. साम-दाम-दंड-भेद या तत्त्वानुसार शिवाजी महाराजांनी काम केलेले त्याविषयी बोलताना महाराजांचा अपमान करण्याचा हेतू कुठेही नव्हता. असे स्पष्टीकरण सोलपूरकर यांनी दिले आहे.
https://www.facebook.com/share/v/14k5FoGURj/?mibextid=xfxF2i
- काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर
- एका मुलाखतीत राहुल सोलपपूरकर म्हणाले होते कि, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले. तेव्हा तिथे पेटारे वगैरे काही नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन महाराष्ट्रात परत आले. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत. मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून त्यांनी सही शिक्याचा अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेल्या परवाना दाखवूनच महाराज आग्र्यातून. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्याहून आले. त्यासंदर्भातले खूण आणि पुराव्या देखील आहेत. हा सगळा इतिहास कथा स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडे रंग भरून सांगावा लागतो पण रंजकता आली की इतिहासाला छेद पडतो.
Leave a Reply