Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

चार पानांच्या चिठ्ठीत शिरीष महाराजांनी लिहिला आयुष्याचा शेवट

पुणे : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी महाराजांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्यांनी आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे.

चार पानी चिठठीत त्यांनी पहिल्या चिठठीत त्यांनी आपल्या वडिलांचा आणि बहिणीला उल्लेख केला आहे. दुसरी चिठठी होणाऱ्या पत्नीला तर तिसरी चिठठी कुटुंबाला तर चौथी चिठठी मित्राना लिहिली आहे.

चिठ्ठ्यामध्ये त्यात लिहिले आहे की, माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे. मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. माझ्यावर एकूण 32 लाखांचे कर्ज आहे, त्यापैकी माझी चारचाकी गाडी विकून 7 लाखापर्यंतच कर्ज फिटेल. मात्र वरचे जे 25 लाख रुपये राहतील ते फेडण्यासाठी माझ्या कुटुंबंला साथ द्या, अशी विनंती गिरीश महाराजांनी त्यांच्या सुसाईड नोटमधून केली आहे.

होणाऱ्या पत्नीला देखील अखेरचे शब्द चिठठीत मांडून महाराजानी , तुला मी अनेक स्वप्न दाखवली. पण ती पूर्ण न करताच मी निघालो आहे. पण माझ्या सखे तू कुठे थांबू नकोस, तूझ आयुष्य जग असा उल्लेख करत होणाऱ्या पत्नीची माफी महाराजानी मागितली आहे.

मला वाटलं होत मी कर्ज फेडू शकेल पण माझ्यात आता लढण्याची ताकत नाही. म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचालत असल्याचे गिरीश महाराजांनी म्हटले आहे. मनाला अतिशय सुन्न करणाऱ्या या घटनेने तुकाराम महाराजांच्या वंशजाने घेतलेली एक्झिट नक्कीच मनाला चटका लावणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »