पुणे : शिंदे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच अपहरण झाल्याचा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याने पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश हा घरातून परदेशात जाण्यासाठी निघाला होता. अशी माहिती ज्यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली त्यावेळी तानाजी सावंत स्वतः तिथे उपस्थित होते. मात्र आमच्या कोणालाही काही न कळवता घरातून निघून जाण्याची पद्धत आमच्या घरात नाही, असं तानाजी सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
अपहराणाबाबत तानाजी सावंत यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांयुक्तालय गाठत पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा केली. यानंतर दोघांनी एक पत्रकार परिषद घेत घडलेला घटनाक्रम कथन केला. ‘ऋषिराज सावंत कुटुंबातील कोणालाही काहीच न सांगता घरातून निघून गेला. त्यानं फ्लाईट घेतलं. त्याला परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणात सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा एफआयआर दाखल आहे. गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. ऋषिराजला सुखरुप परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी फ्लाईट ट्रॅक करण्यात आलं आहे,’ अशी माहिती शर्मांनी दिली आहे.
घरात कोणालाही न सांगता जाण्याची पद्धत आमच्याकडे नाही. आम्ही कुटुंबातील सदस्यांच्या सातत्यानं संपर्कात असतो. पण ऋषिराज आज न सांगता गेला, अशी माहिती तानाजी सावंतांनी माध्यमांना दिली. ‘वाकडला जायचं असेल तर आम्ही एकमेकांना कळवतो. पण ऋषिराज कोणालाच काही न सांगता विमानतळावर गेला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. ते तिघे दुसऱ्याच गाडीनं विमानळावर पोहोचले,’ अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.
Leave a Reply