नवी दिल्ली : नागरिकांच्या प्रश्नांची जाणं असणारा खरा नेता कोण तर सर्वात अगोदर एकनाथ शिंदे यांचे नाव येते. तसेच ठाणे , नवी मुंबई महानगरपालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्याला योग्य दिशा देण्याचे काम एकनाथ शिंद यांनी केले आहे. त्यांनी कधीही पक्षीय भेदभाव ना करता सर्वांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात नक्की होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पावरा यांनी केले आहे.
नवी दिल्ली ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे स्वागताध्यक्ष शरद पवार हे होते. त्यावेळी भाशांदरम्यान त्यांनीए हे कौतुक केले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांना ” महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा” ने गौरविण्यात आले.
यावेळी शरद पवार म्हणाले कि, सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री दिले. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झंझीभाई होते. त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच नांदवळ गावचे शरद पवार देखील याच यादीत येतात. ठाणे, नवी मुंबई, मुंबई या नागरी भाग आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सावळाराम पाटील, रांगणेकर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांचेही आवर्जून नाव घ्यावे लागेल. साताऱ्याचेच कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. पाटील यांना ठाण्याचे नगराध्यक्ष करण्याचा किस्सा पवार यांनी यावेळी सांगितला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संघर्षाचे यावेळी कौतुक केले.
याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार आहे. या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारीची जाणीव आहे. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. महादजी शिंदे यांचे घराण सातारा जिल्ह्यातील कणेरखेड याच जिल्हात माझा ही जन्म झाला. तसेच माजी क्रिकेटपटू सदु शिंदे यांचे शरद पवार जावई आहेत. पवार साहेबांची राजकारणातील गुगलीही कळत नाही. मात्र आपले पवार साहेबांचे चांगले संबध आहेत, त्यामुळे ते मला गुगली टाकणार नाहीत, असे शिंदे म्हणाले.
Leave a Reply