चॅम्पियन ट्रॉफी 2025 वर भारताने 12 वर्षानंतर पुन्हा एकदा नाव कोरले आहे. रोहीत शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरलेली संपूर्ण टीमने चांगली कामगिरी करत ट्रॅफिवर आपले नाव कोरले. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वामुळे भारताने न्यूझीलंडला २५१ धावाचे टार्गेट दिले होते. भारतीय संघ विजयासाठी २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याानंतर रोहीत शर्माने तुफान फटकेबाजी करत सर्वांना आनंदित केले. भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. श्रेयस अय्यरनेही यावेळी ४८धावा केल्या खऱ्या, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला.
पण तरीही भारताने हा सामना जिंकला. भारताचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद आहे. त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा बदला या विजयासह घेतला आहे. कारण २००० साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र यंदा भारताने न्यूझीलँडवर मात करत चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.
Leave a Reply