Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

भारतीय कंपन्यांसोबत करार करण्यासाठी डाओसला जाण्याची गरज काय?, खासदार डॉ. अमोल कोल्हेनी उपस्थित केला सवाल

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या डाओसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अनेक कोटींचे करार करत महाराष्ट्रात रोजगार निर्माण करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. मात्र यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr.amol khole)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डाओसमध्ये होत असलेल्या कंपन्यांची नावं पाहता, अधिक कंपन्या या भारतीय आहेत. मग या कंपन्यांसोबत करार करण्यासाठी डाओसला जाण्याची खरंच गरज होती का? असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

जुन्नर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमंशी बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात राज्य सरकार आहे की नाराज सरकार आहे? असा खिल्ली उडवणारा प्रश्न कोल्हेनी विचारला आहे.

यावेळी कोल्हे म्हणाले की, मंत्री मंडळाचा विस्तार होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आमंत्रण पालकमंत्री पदाच्या नाराजी नाट्यामध्ये सरकारने गुरफटलेले पाहायला मिळत आहे. असंविधानिक पदासाठी हे चढाओढ का करतायेत? केवळ जिल्ह्यातील निधी वाटपाचे हक्क मिळावे, यासाठी हे सगळं चाललंय की विकासासाठी चाललंय? असे अनेक प्रश्न कोल्हेनी उपस्थित केले आहेत.

पुणे -नाशिक रेल्वे रद्द होणार नाहीअसा तोडगा सरकारने काढावा

पुणे-नाशिक रेल्वेला घास हीरवायचा आहे? की तीस देशांच्या संशोधनासाठी जुन्नरमध्ये होणाऱ्या जीएमआरटी प्रकल्पाचं ओझं वाहायचं आहे? असा प्रश्न कोल्हेनी उपस्थित केला आहे. जीएमआरटी हवं असेल तर पुणे-नाशिक रेल्वे रद्द होणार नाही, असा तोडगा सरकारने काढावा. अशी मागणी देखील कोल्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »