पुणे : भोर – महाड मार्गावर असणाऱ्या वरंध घाटात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चारचाकी इको कार 100 फूट खोल दरीत कोसाळल्याची घटना घडली आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहचालकाचा वळणावर अंदाज चुकल्याने ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. बाकीच्यानी सतर्कता दाखवल्याने त्यांचे जीव वाचले आहेत.
शुभम शिर्के असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून मंगेश गुजर (वय 26) , आशिष गायकवाड (वय 29), सिद्धार्थ गंधणे (वय 26), सौरभ महादे (वय 22), गणेश लवंडे (वय 27), अमोल रेकीणरं (वय 27), यशराज चंद्र (वय 22), आकाश आडकर (वय 25) अशी जखमी झालेल्यांची मावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाडवरून भोरच्या दिशेने इको ही चारचाकी येत होती. त्यात नऊ पेक्षा अधिक जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. इको गाडी वरंध घाट परिसरत असणारया उंबरडे गावाजवळ पहाटे चारच्या सुमारास ही गाडी 500 फूट खोल दरीत कोसळली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीना गाडीतून बाहेर काढत रस्त्यावर आणले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने स्थानिक शिरगांव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. कामानिमित्त ते भोरच्या दिशेने निघालेल होते. वरंध घाटात असणाऱ्या एका वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Leave a Reply