धुळे : पुण्यासह अनेक शहरात सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच या सिग्नलच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न धुळ्यातील एका चिमुरडीने केला आहे. धुळे येथील एका सहा वर्षाच्या चिमुरडीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेले असून त्यात सिग्नल यंत्रणेसह वाहतूक समस्या सुरळीत करण्याची मागणी त्या पत्रातून केली आहे.
भव्य जयेश बाफना असे या चिमुरडीचे नाव आहे. तिच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. भव्या हिने धुळ्यातल्या सिग्नल आणि वाहतूक समस्येचा वास्तव आपल्या पत्रातून मांडल आहे. सहा वर्षे चिमुकलीला शहरातल्या समस्या कळत असतील तर प्रशासनाला का नाही? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.शाळेत रस्त्याने जात असताना जाणवलेली समस्या भव्याने थेट पत्रातून मांडण्याचा धाडस केल आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात सर्वत्र सिग्नल यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र, यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने वाहनधारकांसह, नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंद पडलेली सिग्नल यंत्रणा चालू झाल्यास पोलिसांवरील ताण देखील कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या पत्राची खरच दखल घेऊन समस्या सोडवणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
Leave a Reply