पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजरा समिती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि बिडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची भेट झाली आहे. या भेटीत मस्तजोग प्रकरणासंदर्भात काही चर्चा झाली का? याबाबत अद्याप माहिती समोर आली नसली तरी संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी याविषयी शासन पातळीवर मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी जिल्ह्याचे अजितदादा पवार यांची पुणे जुन्नर येथे भेट घेतली.
यावर अजितदादांनी याविषयी विद्युत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना तातडीने फोन करून या विषयी तात्काळ मार्ग काढावा असे आदेश दिले आहेत. बीडकरांना या उन्हाळ्यापुर्वी सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहेच, यातून नक्कीच मार्ग निघेल व माझ्या अनेक वर्षांच्या पाणीपुरवठ्याच्या सर्वप्रकारच्या कामाला यश मिळाले असे विश्वास असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
याबाबत अजितदादा पवार यांनी देखील स्पष्टीकरण दिले असून बिडला गेल्या 21 दिवसांसून पाणी नाही. या संदर्भात संदीप मला भेटायला आला होता. यात काही अर्थ काढू नका असे अजितदादा म्हणालेत.
Leave a Reply