भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकण्यासाठी आज भारत आणि न्यूझीलंड चा अंतिम सामना होत आहे. दुबई येथे हा सामना खेळवला जात असून न्युझीलँड ने टॉस जिंकत पहिली बॅटिंग करताना भारतासमोर 251 धावांचे आव्हान ठेवले आहे.
हा सामना जर भारताने जिंकला तर बारा वर्षानंतर भारत हा चॅम्पियन्स ट्रॉफी वर नाव करणार आहे. कुलदीप यादव वरून चक्रवर्ती यांच्या फिरकी समोर किवीनी नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. न्युझीलँड कडून मीचल मार्श आणि ब्रेस्ट वेल यांची अर्धशतके झाली.
त्यामुळे हा सामना कोण जिंकणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा ऐतिहासिक सामना खेळवला जात आहे. गट टप्प्यातील सामन्यांनंतर हे दोन्ही आता दुसऱ्यांदा अंतिम फेरीत भिडणार आहे. याआधी भारतीय संघाने विजय मिळवला होता. हे दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत.
Leave a Reply