पुणे : सुट्टीचा दिवस असल्याने किल्ले शिवनेरीवर अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र सकाळच्या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाय मंदिर परिसरामध्ये आग्यामुळे किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर चढवला आहे. या हल्ल्यामध्ये 50 ते 60 पर्यटक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज रविवारचा दिवस असल्याने राज्यभरातून किल्ले शिवनेरीवर पर्यटक आपल्या मुलाबाळांचा फिरण्यासाठी येतात. मात्र कडक ऊन असल्याने ऊन देखील मोठ्या प्रमाणावर आहे. किल्ले शिवनेरीवर असणाऱ्या शिवाई मंदिर परिसरामध्ये असणारे एका झाडावर आग्या मोहोळ बसलेले होते. काही अगोदर पर्यटकांनी अगं मला दगड मारल्यामुळे मोहोळ उठले पर्यटकांवर हल्ला चढवला. त्यामुळे असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना चावा घेतला आहे.
हल्ला केल्यानंतर त्यांनी एकच धावपळ सुरू केली असून किल्ल्यावरून खाली येण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळत आहेत. घटनेनंतर आरोग्य विभागाच्या ॲम्बुलन्स शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाल्या आहेत. तर काही विद्यार्थी गडावर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वनविभागाचे आगी मोहोळ शांत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दगड मारल्यानं मधमाश्यांचं मोहोळ उठळे असल्याचे काही पर्यंटकांकडून सांगण्यात येत आहे. जखमीना दवाखण्यात दाखल करण्यासाठी वन विभागा घटनास्थळी दाखल झाला आहे. या घटनेनतर वनविभागाकडून किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
किल्ल्यावर फिरायला येताना पर्यटकांनी आणि शिवप्रेमींनी नी काळजी घेऊन येणे आवश्यक आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक ऊन गड किल्ल्यांवर पाहायला मिळते. त्यामुळे मधमाशा हल्ला करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. वनविभाग विभागाकडून पर्यटकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Leave a Reply