बारामती: राज्यमध्ये अनेक जिल्हे वाढणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. तसेच जिल्ह्याची यादी देखील सोशल मीडियावर व्हायराल झाली होती. त्यात बारामतीसह अनेक जिल्हे नव्याने उदयास येणार आहेत. त्यात बारामती देखील आता वेगळा जिल्हा होणार आहे. यावर आता भाजपचे नेते राधा कृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अशा प्रकारच्या वावड्या कोण उठवत आहे माहित नाही. जिल्हा होणार संदर्भात कोणताही प्रस्ताव शासनापुढे नाही. मी अनेक वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केले आहे. ना त्या प्रस्तावाची कुठे चर्चा आहे. ना जिल्हा अंमलबजावणीची चर्चा आहे. या सर्व बातम्या कपोल कल्पित आहे. याला काहीही अर्थ नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, जयकुमार गोरे टेंभुर्णी येथील एका खाजगी कार्यक्रमासाठी बारामती विमानतळावर मंगळवारी आले होते. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी विखे पाटील यांनी सांगितले की, आमच्या पालकमंत्रिपदबाबत कोणतीही नाराजी नाही. प्रत्येक नेत्याला असं वाटतं की, हा जिल्हा आम्हाला मिळावा. महायुतीमध्ये असे अनेक प्रसंग येत असतात. शेवटी आमचा प्रपंच मोठा आहे. राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा जनादेश पहिल्यांदाच महायुतीला मिळाला आहे. त्यामुळे स्वाभाविकच अपेक्षा वाढलेल्या आहेत. यासंदर्भात तीनही नेते एकत्र बसून मार्ग काढतील. असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.
पीक विमा…
मला कळत नाही की कोण अशा वावड्या उडवत आहेत. शेतकऱ्यांसाठी एवढे मोठे बजेट येत आहे.१ रुपया पिक विम्याचा शेतकऱ्यांवर एवढा मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे पिक विमा बाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. पूर्वी विमा कंपन्यांची घरे भरली जायची असा आरोप होत होता. आता उलटी परिस्थिती आहे. आता शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत झाली आहे. राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झाली आहे.
Leave a Reply