Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

माझ तोंड बंद करण्यासाठी मला नोटिसा : मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या मेव्हन्यासह नऊ जणांना जालना ,परभणी, बीड, आणि छत्रपती संभाजीनगर येथून हद्द्पार करण्यात आले आहे. माझं तोंड बंद करण्यासाठी तू नोटिसा देतो का? माझं तोंड बंद होतं नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी दिली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले कि, 1 सप्टेंबर रोजी जो हल्ला झाला, आमच्या आई बहिणींचं जे रक्त सांडलं गेलं त्याची जाणं आम्हाला आज पण आहे. मी थांबवावं, आरक्षण मागू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील लाखो मुलांवर गुन्हे दाखल केले आहे. राज्यात जेवढ्या मुलांवर गुन्हे दाखल झाले ते सगळे माझे पाहुणेच आहेत असं जरांगे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीसने साखळी उपोषण करणाऱ्या पोरांवर, आमरण उपोषण करणाऱ्या मुलांवर पण गुन्हे दाखल केले . देवेंद्र फडणवीस तू नियत बदल असा सल्ला देत माझे पाहुणे 6 कोटी मराठे असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोकं देवेंद्र फडणवीसला मित्र वाटतात. आमचा जीव गेला तरी चालेल पण राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची भावना असल्याचं जरांगे म्हणालेत. पूर्ण राज्य माझा पाहुणा आहे असं सांगत तू मराठे आंदोलकांना का नोटिसा दिल्या असा सवाल देखील जरांगे यांनी फडणवीसांना केला आहे. पण ,मी थांबत नाही, ओबीसीतून आरक्षण घेणारच अस म्हणत देवेंद्र फडणवीस आमचा प्रामाणिकपणा विकत घेऊ शकत नसल्याचं देखील जरांगे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »