पुणे: पुण्यात शनिवारी रात्री पोलिसांसाठी “तरंग ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी पुण्यातील नागरिकांचे हरवलेले १७ किलो सोने पोलिसांनी या कार्यक्रमादरम्यान परत केले. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीत पुणेकरांना दम दिला आहे. आज तुम्हाला १७ किलो सोने परत केले आहे. ज्यांचे सोने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो कि, जर जर सोने पुन्हा चोरीस गेले तर तुमची काही खैर नाही. जर तुम्हालाच तुमचं सोने नीट ठेवता येत नसेल, तर पोलिसांनी काय काय पकडायचं? कायदा-सुव्यवस्था राखायची की तुमचं सोने वाचवायचं? त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडा. आपण जबाबदार नागरिक आहोत. असे वक्तव्य नेल्याने मुख्यमंत्रांसह केंदीय मंत्री देखील खळखळून हसल्याचे पाहायला मिळाले.
शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर “तरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गाण्यांसोबतच पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुण्यातील नागरिकांचे चोरीला गेलेले १७ किलो सोने संबंधित मालकांना परत करण्यात आले. त्यावेळी अजितदादांनी हे वक्तव्य केले. या प्रसंगावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जोरदार हसले
Leave a Reply