Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

भारताचा पाकिस्तानवर “विराट ” विजय , कोहलीच्या १४ हजार धावा पूर्ण

दुबई : भारत – पाकिस्तान सामन्यात आज भारताचा धडाकेबाज फलन्दाज विराट कोहली याने शानदार फटकेबाजी करत नाबाद १०० रन करत भारताला विजय मिळवून दिला आहे. भारताला हरवण्याची पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताला या महत्वाच्या लढतीत विजय साकारता आला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २४१ धावाचा पल्ला गाठला. मात्र भारताच्या शिलेदारांनी हे आव्हान सहज पेलले. रोहित शर्मा आणि शुभमं गिल हे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर विराट कोहलीने अप्रतिम फलंदाजी करत भारताला सहा विकेट्स राखून विजय मिळवून दिला. भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हा सलग दुसरा विजय ठरला आहे. विराट कोहलीने या सामन्यात नाबाद १०० धावांची खेळी साकारली आणि भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

याच सामन्यात विरोट कोलिने आणखी एक विश्व विक्रम आपल्यता नावावर केला . विराट कोहलीने या सामन्यात सर्वात जलद आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा पल्ला गाठला. विराट कोहलीची या सामन्यातील खेळी भारतासाठी गेमचेंजर ठरली. या खेळीने भारताने थेट सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »